Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रकल्पना गती,

 

कल्याण डोंबिवली शराचा कायापालट करणार 

विविध प्रकल्पला च्या विकास कामाला गती,

              खासदार,श्रीकांत शिंदे,

           कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,

कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा वेगाने होत असलेला विकास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वाचा ठसा उमटवणारा ठरत आहे. अलीकडे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत कल्याण लोकसभा क्षेत्रातील सुमारे पावणे पाच लाख कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गती देण्यात आली असून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

कल्याण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पलावा ब्रिज प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून पुढील दोन ते तीन महिन्यांत तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वे ब्लॉक प्रक्रियेनंतर गार्डर लॉन्चिंग पूर्ण होऊन दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच कल्याण-शीळ रोडवरील मेट्रो लाईन-१२चे काम वेगाने सुरू असून अलीकडील ऑथॉरिटी बैठकीत त्याला आवश्यक मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे कल्याण आणि डोंबिवली परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या विविध सेगमेंटचे कामही प्रगतीपथावर असून जमीन अधिग्रहणातील अडचणी सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महापालिका प्रशासन यांच्यात लवकरच बैठक होणार आहे. दुर्गाडी ते मोठागाव तसेच पुढे काटई-ऐरोली मार्गाला मंजुरी मिळाल्याने वाहतुकीचा पर्यायी मार्ग निर्माण होणार आहे.

भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन अंडरपास, फ्लायओव्हर आणि अॅक्सेस कंट्रोल रोड यांसारख्या सुविधा उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शीळफाटा ते तळोजा मेट्रो विस्तारामुळे तळोजा, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णायक नेतृत्वामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात मेट्रो, रिंग रोड, उड्डाणपूल, अंडरपास, परिवहन सेवा आदी प्रकल्पांना अभूतपूर्व गती मिळाली आहे. आगामी काही वर्षांत या सर्व प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे संपूर्ण मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था आधुनिक होऊन नागरिकांच्या प्रवासात मोठी क्रांती घडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत १०० नवीन बसांचा प्रस्तावही पुढे नेण्यात आला असून शहरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. एकंदरीत, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत कल्याण लोकसभा क्षेत्र राज्यातील आदर्श पायाभूत विकास मॉडेल म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.